शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका, आज उगाचच खुप वर्षांनी आठवली! शाळा तर कधीचीच संपलीय, पण, परीक्षेची धडधड मात्रं तशीच राहीलीय!! "शब्दांचे अर्थ लिहा" म्हटल्यावर, अचूक अर्थ आठवायचेत! आता अर्थही बदललेत आणि, शब्दही अनोळखी झालेत!! "समानार्थी, विरुद्धार्थी शब्द", गुण हमखास मिळायचेत! आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत, अन अर्थांचे अनर्थ झालेत!! "गाळलेल्या जागा भरा", हा प्रश्नं पैकीच्या पैकी गुण देणारा! प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच, गाळलेल्या जागा भरल्यात! आयुष्यातल्या काही जागा मात्रं, आजही रिकाम्याच राहील्यात!! पेपरातल्या "जोड्या जुळवा", क्षणार्धात जुळायच्यात! पण नात्यांच्या जोड्या, कधी जुळल्यात,तर कधी, जुळता जुळता फसल्यात! "एका वाक्यातल्या उत्तरा"नं पाच मिनिटात, पाच गुण मिळवून दिलेत! आयुष्यातले काही सोप्पे प्रश्नं, आजही तिथेच तटस्थ उभे आहेत, एकाच जागी...उत्तराची वाट बघत.. "संदर्भासहीत स्पष्टीकरण" लिहिताच, पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच! आता स्पष्टीकरण देता देता, बरेचसे संदर्भ मागे पडलेत!! "कवितेच्या ओळी पुर्ण" करणं, अग...